तालुका प्रतिनिधी/ सुभाष नाकतोडे
ब्रह्मपुरी : ब्रह्मपुरी तालुक्यातील हजारो लोकांच्या उपस्थितीत नागपूरच्या संविधान चौकातील ओबीसी महामोर्चात समाजबांधवांनी प्रचंड संख्येने हजेरी लावून आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी एकजूट दाखवली.
मराठा समाजाकडून ओबीसी आरक्षणावर होत असलेला अन्यायकारक आक्रमण थांबवावे आणि २ सप्टेंबरचा ओबीसींना घातक ठरणारा काळा जीआर रद्द करावा, जातीय जनगणना झाली पाहिजे ज्याची जेवढी टक्केवारी तेवढी त्याची हिस्सेदारी मिळाली पाहिजे या मागणीसाठी जनतेचा महासागर नागपुरात उसळला.
या मोर्चात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना अशा सर्व राजकीय पक्षांतील ओबीसी बांधवांनी कोणताही भेदभाव न करता एकत्र येत समाजहितासाठी ऐतिहासिक ऐक्य दाखवले आणि या महामोर्चाला प्रतिसाद दिला.
जो पर्यंत २ सप्टेंबरला काढलेला जीआर रद्द होत नाही व जातीय जनगणना होत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील.
No comments:
Post a Comment