“बारामती नगरपरिषदेच्या रणधुमाळीत प्रश्न — नगराध्यक्ष ‘चारित्र्यहीन, जातीयवादी, घराणेशाहीचा’ असावा का?”
बारामती (प्रतिनिधी) — बारामती नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. पण या वेळी जनतेच्या मनात एक वेगळाच प्रश्न घुमतोय — “नगराध्यक्ष कोण असावा?” आणि त्याहून मोठा प्रश्न — “कोण नसावा?”
बारामतीकर आता विचारत आहेत —
👉 नगराध्यक्ष चारित्र्यहीन, बलात्कारी किंवा गुन्हेगार वृत्तीचा असावा का?
👉 नगरसेवक जातीयवादी प्रवृत्तीचा, घराणेशाहीत अडकलेला किंवा मलिदा गॅंग-सेटलमेंट बादशहा गटाशी संबंधित असावा का?
👉 शोरूम-राजकारण, पैसा आणि दबाव यांच्या बळावर निवडून येणारे उमेदवारच पुन्हा हक्क सांगणार का?
की आता बारामतीकर म्हणणार — “आम्हाला हवेत ते जनतेच्या न्यायासाठी उभे राहणारे, गरीबांच्या पाठीशी खंबीर उभे राहणारे उमेदवार”?
बारामती शहरात नुकत्याच झालेल्या सामाजिक चर्चांमध्ये हा प्रश्न ठळकपणे समोर आला —
“नगराध्यक्ष असा असावा का की जो शनिवारवाड्याला मध्यरात्री गुप्त मिटिंग करून प्रकरण मिटवतो?”
“की असा असावा जो अन्यायग्रस्तांच्या हक्कासाठी उभा राहतो?”
शहरात सध्या या चर्चेला जोरदार उधाण आले आहे.
काही नागरिक विचारतात — “बारामतीला आता स्वच्छ, निडर आणि प्रामाणिक नेतृत्व मिळेल का?”
तर काही म्हणतात — “घराणेशाहीचा शेवट या निवडणुकीत होणार का?”
आगामी काही दिवसांत उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होताच, हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न बनला आहे —
या वेळी बारामतीच्या जनतेच्या भावना कोणत्या उमेदवारांवर उतरतील?
आणि अखेर बारामतीला “जनतेचा” नगराध्यक्ष मिळेल का?
💬 चर्चेतील प्रश्न:
- बारामतीला खऱ्या अर्थाने “जनतेचा” नगराध्यक्ष मिळणार का?
- पैसा, सेटलमेंट आणि घराणेशाही यांचा शेवट या निवडणुकीत होईल का?
- पात्र, प्रामाणिक आणि सामान्य जनतेच्या बाजूने उभा राहणारा उमेदवार कोण ठरणार?
No comments:
Post a Comment