❓ मुख्य प्रश्न – बारामतीकरांच्या मनातले:
निष्ठावंतांवर अन्याय की नवे नेतृत्व? स्वतःचा विकास की नागरिकांचा? गुन्हेगारी छायेतले चेहरे की स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार?
बारामती -: बारामती नगरपालिकेची निवडणूक दिवसेंदिवस रंगत वाढत चालली आहे. शहरात उमेदवारी अर्ज भरण्याची लगबग सुरू झाली असताना, शरद पवार गटाकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर न झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी पायताण उचलत, निष्ठेच्या बॅनरखाली काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना एकच प्रश्न छळतो आहे — “आम्हाला नेमकी संधी केव्हा मिळणार?”
🔹 निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होणार का?
बारामतीत चर्चा अशी आहे की, अनेक वर्षे पक्षाला वाहिलेले निष्ठावंत कार्यकर्ते पुन्हा एकदा केवळ "चादर उचलण्याचे" कामच करणार का? निर्णय प्रक्रियेत त्यांना संधी मिळेल का नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
🔹 स्वत:चा विकास की नागरिकांचा?
बारामतीकरांमध्ये असा प्रश्नही डोके वर काढत आहे की, "नेते स्वतःचा विकास पाहतात की सामान्य नागरिकांचा?"
🔹 अजित पवार गट नवीन चेहऱ्याला संधी देणार का?
दुसरीकडे, अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी नवीन चेहरा दिला जाणार का? की गेल्या काळात वादग्रस्त निर्णय, नागरिकांवरील अन्याय, अतिक्रमण, बँकिंग अनियमितता, हायवा-डंपर प्रकरणांवरील चर्चा, या सर्व छायेत राहिलेले जुने चेहरेच पुढे आणले जाणार — हा मोठा प्रश्न आहे.
🔹 वादग्रस्त आरोपांवर जनतेचे प्रश्न
शहरात जनतेमध्ये खालील प्रश्न मोठ्या प्रमाणावर चर्चिले जात आहेत —
गुन्हेगारी छायेत राहिलेल्या नावांना पुन्हा संधी दिली जाणार का?
नागरिकांना त्रास देणाऱ्या वाहनधारकांना संरक्षण देणाऱ्यांना पुन्हा पद देणार का?
अतिक्रमण करून व्यावसायिक स्थळे उभारणाऱ्यांना नगराध्यक्ष पद मिळणार का?
बँक व्यवहारांमधील घोटाळ्यांवरून चर्चेत आलेल्या काही व्यक्तींना पुन्हा निवडणुकीत पुढे केले जाणार का?
गोरगरीब पतविक्रेत्यांवर कारवाई करून त्यांना उपासमारीला लावणाऱ्यांना पक्ष पुन्हा पाठबळ देणार का?
हे प्रश्न सध्या बारामतीकरांच्या चर्चेचा मुख्य विषय बनले आहेत.
🔹 शेवटचा आणि सर्वात मोठा प्रश्न
“बारामतीला नेमके कसे नेतृत्व हवे आहे — विकासाभिमुख की वादग्रस्त?”
शरद पवार गट निष्ठावंतांना संधी देणार का?
अजित पवार गट नवीन चेहरा आणणार की जुन्यांनाच संधी?
नगरपालिकेला स्वच्छ प्रतिमेचे नेतृत्व हवे की वादग्रस्त अनुभव असलेले?
स्वत:चा विकास करणाऱ्यांवर जनता खुश आहे का?
नागरिकांची सुरक्षा आणि विकास हे खरोखर प्राधान्य आहे का?
हायवा-डंपर प्रकरणातील नावांवर निर्णय प्रक्रिया होणार का?
अतिक्रमण करणाऱ्यांना नगराध्यक्ष पद देणे योग्य का?
बँक घोटाळा चर्चेत असलेल्या व्यक्तींची निवडणूक पात्रता काय?
गरीब पतविक्रेत्यांची समस्या हाताळणारा नेता कोण?
बारामतीला खरे नेतृत्व कोण देणार?