Tuesday, April 29, 2025

जळगाव सुपे ग्रामसेविका दीपाली हिरवे यांच्यावर कारवाई होणार का? — शासनाच्या पत्राने निर्माण केली नवी शक्यता!



बारामती: बारामती तालुक्यातील जळगाव सुपे येथील रहिवासी अमित लक्ष्मण बगाडे यांनी त्यांच्या खाजगी जागेवरील बेकायदेशीर बांधकामाविरोधात दि. 10/04/2024 रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, विकास आस्थापना शाखा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता.

या तक्रारीवर विकास अधिकारी, पंचायत समिती, बारामती यांच्याकडून उत्तर देण्यात आले. परंतु, अमित बगाडे यांना मिळालेले उत्तर समाधानकारक नसल्याने त्यांनी ही तक्रार ‘आपले सरकार’ पोर्टलवरून escalated टप्प्यावर पुन्हा एकदा पाठवली. त्यानंतर दि. 27/08/2024 रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्वरित कारवाईसाठी अधिकृत पत्र पाठवण्यात आले.


या पत्रात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे की, तक्रारदार यांच्या अर्जातील मुद्द्यांचा ग्रामपंचायत अधिनियम 1958 अन्वये तातडीने पाठपुरावा करून योग्य ती कार्यवाही करावी. तसेच संबंधित तक्रारदाराशी थेट संपर्क साधावा, अशीही विनंती केली आहे.

या पार्श्वभूमीवर सर्वांचे लक्ष लागले आहे की, ग्रामसेविका दीपाली हिरवे आणि इतर संबंधितांवर प्रत्यक्षात काय कारवाई होते? काय ही बाब केवळ कागदावरच राहणार आहे की खरोखरच बेकायदेशीर बांधकामावर लगाम लावला जाणार आहे?


निष्कर्ष:
शासन स्तरावरून स्पष्ट निर्देश आल्यामुळे ग्रामसेविका व संबंधितांवर कारवाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता प्रशासन कितपत तत्परतेने कार्यवाही करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Wednesday, December 18, 2024

माळेगाव: महिलांची सुरक्षा धोक्यात? दारू, गांजा, मटका, जुगार आणि अवैध धंद्यांचे ‘माहेरघर’ बारामती तालुक्याला काळिमा?


माळेगाव -: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती तालुक्यातील माळेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत महिलांची सुरक्षा पूर्णतः धोक्यात आली आहे का? गुन्हेगारी प्रवृत्ती आणि अवैध धंद्यांचा सुळसुळाट सर्वसामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा मुद्दा बनला आहे का? विशेष म्हणजे, या हद्दीत असे प्रकार घडत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असल्याचे चित्र आहे का?

महिलांवरील अत्याचार आणि असुरक्षितता?

नुकत्याच घडलेल्या घटनेत एका जिम ट्रेनर महिलेवर प्राणघातक हल्ला करण्यात आला? तिला लज्जास्पद वागणूक देण्यात आली का? या घटनेने माळेगावसह बारामती तालुक्यात खळबळ उडाली आहे का? महिलांसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या या भागातील वाढते गुन्हेगारी प्रकार चिंतेची बाब बनली आहे का?

अवैध धंद्यांचे साम्राज्य?

दारू, गांजा, मटका, जुगार, तसेच ताडीचे अवैध धंदे माळेगावात खुलेआम चालू आहेत का? हे धंदे पोलिसांच्या अभयामुळे अधिक फोफावत असल्याचा आरोप खरा आहे का? नागरिकांच्या म्हणण्यानुसार, डीबी टीम आणि उपनिरीक्षक देवांचा दास हे हप्ते घेऊन या गुन्हेगारीला खतपाणी घालत आहेत का? या प्रकारांमुळे माळेगाव गुन्हेगारी केंद्र बनले आहे का?

पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर संशय?

नागरिकांच्या मते, माळेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी अवैध धंद्यांपासून हप्ते घेत आहेत का? त्यामुळे त्यांना अभय मिळत आहे का? नवीन सहाय्यक पोलीस निरीक्षकांनी या प्रकारांकडे दुर्लक्ष केले आहे का? की त्यांची देखील भूमिका संशयास्पद आहे?

बारामतीची प्रतिमा डागाळली आहे का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या बारामती तालुक्यात महिलांवरील हल्ले, गुन्हेगारीचे प्रमाण वाढणे, तसेच खुलेआम अवैध व्यवसाय चालणे, यामुळे बारामतीची प्रतिमा डागाळली आहे का?

नागरिकांची मागणी?

नागरिकांनी या प्रकरणाची तात्काळ सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे का? महिलांच्या सुरक्षेसाठी कडक उपाययोजना राबवणे, तसेच अवैध धंद्यांवर कायमस्वरूपी बंदी घालणे, ही प्रमुख मागणी आहे का?

वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्थानिक प्रशासनाने या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून त्वरित पावले उचलली नाहीत, तर नागरिकांचा उद्रेक होऊ शकतो का?

Tuesday, April 23, 2024

बारामती लोकसभा निवडणूक 2024 पुरंदर इंदापूर तालुक्यामध्ये मुलगी व सून निवडून आणण्यासाठी केला जातोय का नोटांचा वर्षाव?



 बारामती -: बारामती लोकसभा निवडणूक 2024 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार गटाच्या उमेदवार सुप्रिया सुळे असून तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या उमेदवार सौ सुनेत्रा पवार  या असून  पूर्ण देशाचे लक्ष बारामती लोकसभा मतदार संघाकडे लागले असून दोन्ही पक्षाच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी पदाधिकारी व पक्ष प्रमुखांनी कंबर खसली आहे.

 सर्वसामान्य नागरिकांकडून दबक्या आवाजामध्ये अशी चर्चा होत आहे की जे कंपन्यांमध्ये बारामती एमआयडीसी मध्ये काही कामगार आहेत त्यांना दम देण्यात येत आहे आम्हाला जर मतदान दिले नाही तर तुम्हाला कामावरती ठेवले जाणार नाही अशी देखील चर्चा कामगारांच्या तोंडून ऐकायला मिळत आहे नेमकं सत्य काय?

 तसेच पुरंदर,इंदापूर,दौंड,बारामती, भोर, खडकवासला या तालुक्यांमध्ये अमाप पैशाची देखील मंडळाचे अध्यक्ष प्रमुख यांना दिला जात आहे अशी देखील चर्चा सर्वसामान्यांमध्ये होत आहे. नेमकं यामागचं सत्य काय?

 सर्वसामान्य नागरिकांचे मत हे नागरिक नेमका यांनी विकास काय केला या वरती विचार करून देणार आहे. अशी देखील चर्चा नागरिकांमध्ये  होताना दिसत आहे.

 या दोन्ही उमेदवारांपैकी कोणीही निवडून आला तरी नेमकं गरिबाचं जीवन बदलणार आहे का? हा देखील सर्वसामान्य गरीब विचार करत आहे.

 मराठा समाजाचे आरक्षणाचा प्रश्न असो तसेच इतर  प्रश्न असो  कित्येकांना दिशाभूल करून आज पर्यंत असंच झुलवत ठेवले चा देखील चर्चा नागरिक दबक्या आवाजात करत आहे.

 बारामती लोकसभा निवडणूक 2024 ते मतदारांनी मतदान करताना पूर्ण विचार करून मतदान आपल्याला उपयोगी हे दोन्ही उमेदवार पडणार नाहीत याचा विचार करून मतदान करावे.

Monday, August 28, 2023

जलजीवन मिशन योजना ही जनतेच्या हिताची प्रत्येक गावांनी त्याचा लाभ घेऊन,चांगला उपयोग करावा.





खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन जल जिवन मिशन ही केंद्र शासनाची पुरस्कृत व महत्वांकाक्षी य़ोजना.

                          - बारामती लाईव्ह -

 प्रतिनिधी-: सुभाष नाकतोडे

 ब्रम्हपुरी :-जल जिवन मिशन अंतर्गत  ग्रा.पं.लाखापुर ता.ब्रम्हपुरी जि.चंद्रपुर या गावातील प्रत्येक घरात वैयक्तिक १०० % नळजोडणी झाल्याने मा.प्रधानमंत्री यांचे कडून अवॉर्ड प्राप्त झाल्याने खासदार अशोक नेते व माजी आमदार अतुल भाऊ देशकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार व अभिनंदन कार्यक्रम ग्रामपंचायत कार्यालय लाखापुर येथे आयोजित करण्यात आले होते.

यावेळी मंचावर प्रामुख्याने खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोक नेते, माजी आमदार तथा लोकसभा संयोजक प्रा.अतुल भाऊ देशकर, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रविंद्र ओल्लालवार, सरपंच्या सौ.चंद्रकला मेश्राम, उपसरपंच सौ‌मालनबाई गायकवाड, ब्रम्हपुरी भाजपा शहराध्यक्ष अरविंद नंदुरकर, ओबीसी मोर्चा चे शहराध्यक्ष प्रा.सोलोटकर सर,नगरसेवक मनोज वठठे,प्रसिद्धी प्रमुख संजय लांबे, ग्रा.प.सचिव  भुमेशवर हुमे,  ग्रा.प.सदस्य श्रावण दुधकुळे,ग्रा.प.सदस्या निला राऊत,लता कुथे,जयपाल राऊत,हरीचंद बनकर,तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

या आयोजित कार्यक्रमा प्रसंगी खासदार अशोक नेते यांनी बोलतांना घरगुती नळ जोळणी प्रकल्प केंद्र शासनाची पुरस्कृत योजना जलजीवन मिशन हर घर जल,हर घर नल ,या योजनेचा लाभ प्रत्येक गावांनी घ्यावा.पाणी हे जीवन आहे. पाण्यासाठी अनेक गावांतील, शहरातील ग्रामीण भागांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती.परंतु विहीरी, बोरवेलद्वारे शुद्ध पाणी मिळत नव्हता,अशुद्ध पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येऊ अनेक बिमारीचा सामना करावा लागत होता.

यासाठी देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांनी हर घर नल,हर घर जल हि योजना आणली. या योजनेअंतर्गत नागरिकांचे जीवनमान सुधारण्यासाठी या योजनेचा उद्देश असुन या योजनेद्वारे प्रत्येक घरात पिण्याचे  शुद्ध पाणी मिळावे. हा योजनेचा उद्देश आहे.

यासाठी जलजीवन मिशन अंतर्गत ग्रामपंचायत लाखापुर या गावातील प्रत्येक वैयक्तिक १०० % नळ जोळणी  झाल्याने या देशाचे विश्वगौरव, पंतप्रधान मान.नरेंद्र जी मोदी  यांच्याकडून लाखापुर या गावातील ग्रामपंचायत अवॉर्ड  प्राप्त झाले ही आनंदायी बाब आहे.हा अवॉर्ड दिल्ली येथील केंद्रीय  जल मंत्री मान. गजेंद्र जी शेखावत ,यांच्या हस्ते सरपंच्या सौ. चंद्रकला मेश्राम यांना सुपूर्त करण्यात आला.केंद्र शासनाच्या  विकास कामासाठी सातत्याने माझा सुद्धा प्रयत्न राहील ‌ असे प्रतिपादन खासदार अशोक नेते यांनी याप्रसंगी केले.

पुढे बोलतांना खासदार महोदयांनी आपल्या महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यातील लाखापुर या छोटयाशा गावांनी सदर जलजीवन मिशन योजनेत ग्रामपंचायतीने अवॉर्ड प्राप्त केला.ही कौतुकास्पद,गौरवशाली बाब आहे,जलजीवन मिशन योजना ही जनतेच्या लाभदायी. प्रत्येक गावांनी लाभ घेऊन, चांगला उपयोग करावा.असे प्रतिपादन यावेळी केले.

माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर यांनी बोलतांना ,या गावात जनतेच्या सहकार्याने लोकसहभागाने हा अवॉर्ड प्राप्त झाला ,या गावात पिण्याच्या पाण्याची आवश्यकता होती.ती आता दूर झाली.आपल्या गावातील प्रगती कशी करावी.यासाठी एकत्र यावे व आपल्याला हा अवॉर्ड प्राप्त झाल्याबद्दल मान पंतप्रधान मोदीजींना समर्थन देऊन  त्यांचे धन्यवाद म्हणावेत असे यावेळी अतुलभाऊ यांनी वक्तव्य केलं.

सरपंच सौ. चंद्रकला मेश्राम यांनी आपल्या या छोट्याशा गावात माननीय खासदार अशोक जी नेते व माजी आमदार अतुलभाऊ देशकर यांनी कार्यक्रमाप्रसंगी आले.आमचा सत्कार,व अभिनंदन केल ही आमच्या गावासाठी गौरवाची, आनंदाची अभिमानास्पद बाब आहे असे यावेळी बोलल्या.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने फळबाग वाटिका येथे भेट दिली. या फळबाग वाटिकेत सिताफळ, करवंद, केळी, तसेच असे अनेक प्रकारचे झाडे आहेत.

वंचित च्या धसक्याने निरावागज येथे विशेष ग्रामसभा होणार



मुख्यसंपादक -: अमित बगाडे 


- बारामती लाईव्ह -



बारामती -: प्रियंका बाळासाहेब देवकाते मौजे निरावागज येथील रहिवासी असून त्यांनी दिनांक २४/८/२०२३ रोजी ग्रामपंचायत निरावागज तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती यांना लेखी पत्र दिले होते की, २५/८/२०२३ रोजी होणारे ग्रामसभा बेकायदेशीर असून ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम (७ )नुसार ग्रामसभा ही किमान सात दिवस अगोदर गावामध्ये दवंडी देऊन तसेच नोटीस बोर्ड वरती जाहिरात प्रसिद्ध करून तसेच ग्रामसभे अगोदर वार्ड सभा महिला सभा घेण्यात यावेत.

 तसेच ग्रामपंचायतच्या नोटीस बोर्डवर ग्रामपंचायतचा अजेंडा काय आहे तसेच ग्रामपंचायत मार्फत कोणकोणते ठराव घेतले जाणार आहेत याची माहिती प्रसारित केली जाईल. तसेच ऐन वेळेस येणारे विषय मांडण्यासाठी किमान दोन दिवस अगोदर ग्रामसेवक तसेच सरपंचांकडे अर्ज सादर करावी लागतील.

 अशी नियमानुसार तरतूद असताना, कोणताही ग्रामपंचायत अधिनियमचा वापर न करता बेकायदेशीर सभा त्या ठिकाणी घेतली जात होती. म्हणून त्यांनी त्याचा निषेध करत ग्रामसभेत कोणीही सहभागी होऊ नये व नियमानुसार सभा घेण्यात यावी अशी मागणी केली होती.

        परंतु ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी भ्रष्ट कारभार करत ग्रामपंचायत ग्रामसभा बोगसपणे आटपण्याची तयारी केलेली. ती बोगस ग्रामसभा थांबविण्यासाठी त्यांनी पुन्हा 24/8/2023 रोजी सहा वाजता लेखी पत्राने सभा ग्रामपंचायत अधिनियम नुसार घेण्यात यावी अन्यथा  25 /8 /2023 रोजी तहसील कार्यालय बारामती येथे उपोषणास बसणार आहे असे असे कळवले होते.

परंतु पदाचा गैरवापर करत ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांनी ग्रामसभा बेकायदेशीर रित्या घेतल्याने प्रियांका देवकाते यांना उपोषणास बसावे लागले.

            उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा पूर्व जिल्हाध्यक्ष राज कुमार साहेब यांनी प्रशासनाला जाब विचारत आंदोलनाची दाखल घेण्यास भाग पाडले. तसेच पुणे जिल्हा महासचिव मंगलदास निकाळजे, संपर्क प्रमुख ऍड वैभव कांबळे, ऍड संतोष कांबळे, शहर सचिव विनय दामोदरे तसेच नालंदा विपश्यना प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मण(तात्या) भोसले तसेच आबासो भोसले , काशिनाथ भोसले यांनी उपोषणाची तात्काळ दखल घेत दिनांक 26/8/2023 रोजी स्थानिक प्रशासनाला धारेवर धरत गंभीर दखल घेण्यास भाग पाडत त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांचे उपोषण सोडण्याचे काम केले.

यामध्ये त्यांचे वडील बाळासो आप्पाजी देवकाते, चुलते यशवंत अप्पाजी देवकाते, शिवाजी देवकते व फक्कड आप्पाजी देवकाते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते दत्तात्रय शिवाजी भोसले, श्री रविदास प्रतिष्ठान निरावागजचे सचिव मा.संदीप भोसले तसेच इतर ग्रामस्थ निरावागज यांनी उपोषणाला पाठिंबा देत प्रशासनावर दबाव निर्माण करत मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.

       प्रशासनाने झालेल्या ग्रामसभेची चौकशी करुन विशेष ग्रामसभा घेणार असल्याचे लेखी दिले. त्यावेळी देवकाते यांनी सर्वांचे आभार मानले व उपोषण मागे घेतले.

अंदर मावळ मधील लोकप्रिय आमदार सुनील (अण्णा) शेळके यांच्या प्रयत्नातून झालेल्या विकास कामाचे भूमिपूजन



प्रतिनिधी -: ज्ञानेश्वर वाघमारे


                      - बारामती लाईव्ह -


मावळ -: मावळचे लोकप्रिय आमदार *मा श्री सुनील आण्णा शेळके* यांच्या प्रयत्नातून इंगळून येथे मारुती मंदिराच्या सभांमडपाचे व कुणे येथे श्री दत्त मंदिराचे. भूमिपूजन मान्यवरांचा हस्थे  करण्यात आले.


या वेळी प्रमुख उपस्थित  *नवलाख उंबरे गावचे सरपंच मा .श्री दत्तात्रय आण्णा पडवळ* .ग्रुप ग्रामपंचायत इंगळूंनचे .सरपंच सूनिताताई सुपे. उपसरपंच अरूणाबाई ठाकर .सदस्या सविता पाटारे. सदस्या ललिताताई थरकुडे. सदस्य बबन चतुर. सदस्य कांतांराम  तळपे .ग्रामस्थ मा.सरपंच वसंत थरकुडे. मा. सदस्य.काळू शिंदे.दामू थरकुडे.शंकर थरकुडे.व विष्णू शिंदे. सुदाम ठाकर.प्रकाश थरकुडे .विकास ठाकर .महादू थरकुडे.मारुती करवंदे . रामचद्र थरकुडे .उमेश थरकुडे.उमेश थरकुडे.किरण थरकुडे.संतोष थरकुडे. शुभाष मोधळे स्याम पवार मंगेश जाधव कृष्ण भंडारी. लक्ष्मण पाठारे जालिंदर जोरी. मा सरपंच संदीप टकले. उत्तम शिंदे. नवनाथ जोरी. सोमनाथ पाठारे. सागर गोडे. आदेश जोरी. सुरज पिंगळे. शितलताई.थरकुडे.आर्चनाताई थरकुडे.मगलताई चतुर. .इत्यादी  उपस्थित होते..

अ. ब. ब चक्क उपमुख्यमंत्री यांच्या गावातील ग्रामस्थांचा आवाज का दाबला जातोय?







मुख्यसंपादक -: अमित बगाडे 

बारामती लाईव्ह 



बारामती -: बारामती तालुक्यातील कन्हेरी येथे 15 ऑगस्ट 23 रोजी ग्रामसभेत विविध विषय लोकांच्या अडचणी तसेच विविध योजनेपासून वंचित असलेल्या नागरिकांनी आवाज उठवला ग्रामदैवत मारुती मंदिर याचा ट्रस्ट चा विषय तसेच दानपेटीतील दान हे  कोणालाही विचारात न  घेता ग्रामस्थांचे  असे म्हणणे आहे

 ते दान घराणेशाही हुकूमशाही असणाऱ्या राजकीय मोठ्या कुटुंबाचे व्यक्ती घेऊन जातात तसेच त्या दान पेठी मधील दान नेमक जाते कुठे? त्याचा कुठला हिशोब देखील नाही? एक ना अनेक समस्या तेथील नागरिकांना येत असून त्या समस्यांना सामोरे जावे लागते.


परंतु ग्रामस्थांचा आवाज दाबण्याच्या हेतूने त्यांच्यावरती खोटे केसेस देखील केलेले आहे. आज दिनांक 28 ऑगस्ट 23रोजी ग्रामपंचायत  कन्हेरी येथे ग्रामस्थ कंटाळून आंदोलन उपोषणाला बसले होते. त्या ठिकाणी काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग  रोहित बनकर यांना बोलवण्यात आले. तसेच भाजप बारामती तालुका अध्यक्ष पांडुरंग कचरे हे देखील उपस्थित होते.

काँग्रेस  महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओबीसी विभाग रोहित बनकर आल्यानंतर  त्यांनी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या तात्काळ बारामती पंचायत समितीचे बीडिओ यांना त्या ठिकाणी बोलावले तसेच तात्काळ बारामती तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षण त्या ठिकाणी आले. त्यांनी ठराविक नागरिकांशी चर्चा केली व आम्ही सर्व विषय मार्गी लावू.

हा वाद  मिटून ग्रामस्थांना न्याय मिळवून देऊ असे आश्वासन दिले. ग्रामस्थांना समाधानकारक उत्तर मिळालेले नाही. कान्हेरी गावातील ग्रामस्थांनी   असे सांगितले आहे की येणाऱ्या चार दिवसात आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही उपोषण करणार आहोत.

तसेच ज्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आहे त्या अधिकाऱ्यांनी जर दिशाभूल केल्यास त्यांच्यावर देखील कारवाईची मागणी करणार आहे. हा वाद गाव पातळीवर ती मिटेल का? लवकरच नवीन अपडेट बारामती लाईव्ह जनतेसमोर घेऊन येणार आहे.


🔴 ब्लॅकमेल व मानसिक छळातून तरुणाची आत्महत्या; खडकवासला येथील तिघांविरुद्ध गुन्हा, आरोपी तरुणीचे वडील API – अटकेबाबत चर्चेला उधाण

बारामती तालुक्यातील मौजे रुई बयाजीनगर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेत 23 वर्षीय तरुणाने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची...